प्रत्येक माणसात बऱ्याचदा परस्पर विरोधी गुणधर्म असतात. म्हणजे अनेक धाडसी
कृत्य करणारा माणूस पाल किंवा झुरळांना घाबरताना आपल्याला दिसतो. अनेकदा
घाबरट म्हणून ओळखला जाणारा मनुष्य धाडसी कृत्य करून जातो. हे का घडते? तर
माणूस अनेकदा वेळेनुरूप आपल्यातील क्षमता वापरतो. कित्येकदा तर आपल्यात अशी
क्षमता होती हेही अनेकांना माहित नसते.
माझी आई देखील काहीशी अशीच. तिला बोटीत बसायची भीती वाटायची, लिफ्टमध्ये बसायला ती भयंकर घाबरायची. इतकेच काय तर पाल आणि कुत्रे दिसले तरी त्यांच्यापासून १० फुट दूर जायची. पण सगळ्यात भयानक प्राणी... माणूस... याठिकाणी मात्र ती चांगलीच शूर होती. तिच्या मते आपण या प्राण्याला जितके जास्त घाबरतो, तितका हा प्राणी प्रबळ होतो. आणि या प्राण्याला वेळीच आवर घातला नाही तर याचे परिणाम वाईटही होऊ शकतात.
हा किस्सा आहे तिच्या शालेय जीवनातील. त्यावेळेस माझी आई मॅट्रिकला होती. त्यासाठीच तिने नाशिकच्या ‘गायकवाड क्लासेस’ मध्ये प्रवेश घेतला होता. तिला नवनवीन फॅशनची भारी हौस. त्याकाळी “आम्रपाली” हाराची चांगलीच क्रेझ होती. त्यामुळे ती नेहमी तो हार घालूनच क्लासला जायची. तिच्या क्लासमध्ये एक मुलगा होता. तो तिला त्या हारामुळे आम्रपाली म्हणू लागला. इथपर्यंत ठीक होते. आईने त्याकडे दुर्लक्ष केले. पण दिवसेंदिवस त्याची मजल वाढत गेली. आई जिथे दिसेल तिथे तो तिच्यावर शेरे मारू लागला. इतकेच काय पण आई आणि आजी बरोबर कुठे जात असतील तरी त्याची शेरेबाजी चालू झाली. आजी सोबत असल्यामुळे तिला शांत बसणे भाग होते. पण एक दिवस ते आजीच्या लक्षात आले.
“बेबी... तो मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का?” आजीने विचारले.
“कोणता मुलगा?” खरे तर आईने आधीच त्या मुलाला पाहिले होते.
“तो बघ... त्या मुलांच्या घोळक्यात उभा आहे तो...” त्या मुलाकडे इशारा करत आजीने विचारले.
“नाही गं आई... मी नाही ओळखत त्याला.”
“मग तो तुझ्याकडे पाहून का आम्रपाली म्हणतोय?”
“ते मला काय माहित? आणि माझे नाव काय आम्रपाली आहे का?” आईने वेळ मारून नेली.
“बघ हं... आज मी सोबत असताना देखील तो मुलगा तुला चिडवतोय... उद्या त्याची मजल वाढत जाईल तेंव्हा मात्र हे प्रकरण जास्तच वाढलेले असेल.” आजीने आता तिला सावध केले.
“आई... तू नको उगाच काळजी करत बसू... चल... आपल्याला उशीर होतोय...” म्हणत तिने चालण्याचा वेग वाढवला. पण त्याला योग्य धडा शिकविण्याचे त्याच वेळेस ठरवले.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा ती क्लासला आली त्यावेळेस ‘तो मुलगा कुठे दिसतोय’ हेच शोधत होती. पण त्या दिवशी तो मुलगा गैरहजर होता. तरीही तिने ही गोष्ट गायकवाड सरांच्या कानावर घालायचे ठरवले. क्लास सुटला तशी ती सरांसमोर हजर झाली.
“सर... माझी एक तक्रार आहे.”
“तक्रार? कशाबद्दल?” सरांनी विचारले.
“आपल्या क्लासला एक मुलगा आहे. तो मला कायम चिडवतो. इतके दिवस मी दुर्लक्ष केले. पण हळूहळू त्याची मजल वाढते आहे. काल माझी आई माझ्या सोबत असताना त्याने शेरेबाजी केली. आणि कित्येकदा क्लासमध्येही तो मला आम्रपाली म्हणून चिडवतो.” आईने एका दमात सगळे सांगून टाकले.
“अस्सं... थोडं आधी तर सांगायचं मला! आताच चांगली कानउघाडणी केली असती त्याची.” सर म्हणाले.
“आज तो आला नाहीये...”
“ठीक आहे... जेंव्हा येईल तेंव्हा मला दाखव तो मुलगा...”
“हो सर... नक्कीच...” इथवर संभाषण थांबले.
दोन तीन दिवसांनी तो मुलगा क्लासला आला. क्लास सुटला तशा मुली बाहेर पडू लागल्या. तेवढ्यात तिला मुलांच्या रांगेतून “आम्रपाली” हा शब्द ऐकू आला. तो इतक्या मोठ्याने होता की सरांनी देखील तो आवाज ऐकला. आईच्या मैत्रिणी बाहेर पडल्या पण आई मात्र दारातच उभी राहिली. सरही तिच्या जवळ येऊन उभे राहिले. सर्व मुली बाहेर पडल्यावर एकेक करून मुले बाहेर पडू लागले. क्लासला एकच दरवाजा असल्यामुळे त्या मुलाला देखील तेथूनच जाणे भाग होते. त्या मुलाने आईला दारात उभे राहिलेली पाहिल्यामुळे तो तोंड लपवत तेथून जाऊ लागला. पण आईचे लक्ष होतेच. तिने त्याच्याकडे बोट दाखवून सरांना सांगितले आणि सरांनी त्याला बाजूला बोलावले. सर्व मुले निघून गेल्यावर सरांनी सुरुवात केली.
“काय रे? नाव काय तुझे?”
त्याने नाव सांगितले.
“तू इथे मुलींना चिडविण्यासाठी येतो की पास होण्यासाठी?”
“काय झालं सर?” त्या मुलाने आपल्याला काहीच माहिती नाही अशा अविर्भावात विचारले आणि सरांनी कोणताही विचार न करता त्याच्या श्रीमुखात भडकवली.
“हे बघ... तू किंवा तुझ्या मित्रांपैकी कुणीही कोणत्याही मुलीला इथे किंवा बाहेरही चिडवले किंवा त्यांच्यावर काही शेरेबाजी केली तर सगळ्यांना हाताला धरून बाहेर काढेन. मला गरज नाही अशा विद्यार्थ्यांची. माझ्या विद्यार्थिनींच्या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट मी खपवून घेणार नाही. समजलं?” सरांनी दम भरला आणि तो मुलगा काही न बोलता तेथून चालता झाला.
त्यानंतर जो पर्यंत क्लास चालू होता कुणीही आईला चिडविण्याची हिंमत केली नाही.
एक दिवस आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना पुन्हा “आम्रपाली” म्हणून आवाज आला. आईने पाहिले तेंव्हा तो मुलगा त्याच्या एका मित्राबरोबर गल्लीच्या कडेला उभा राहून हसत होता. क्लास संपल्यामुळे सरांचा धाकही संपला होता. आवाजाबरोबर आई थांबली तशा तिच्या मैत्रिणी तिला ‘चल इथून’ असे म्हणू लागल्या. पण आई तशीच वळली आणि त्या मुलाच्या समोर जाऊन उभी राहिली.
“तू मगच्या आळीत गायधनी वाड्यात राहतोस ना? तुझी आईही भद्रकाली मंदिरात दर्शनाला येत असते. जर तू सुधारला नाहीस तर या गोष्टी तुझ्या आईला जाऊन सांगेन. समजलास?” इतके बोलून त्याच्या प्रत्युत्तराची वाटही न पाहता ती मागे वळली.
दोन तीन दिवसांनी परत त्याच रस्त्याने माझी आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना तिला तो मुलगा २/३ मित्रांबरोबर गप्पा मारताना दिसला. तेवढ्यात त्याच्या एका मित्राने तिला पुन्हा “आम्रपाली” म्हणून चिडवले.
“ए भो... ती आम्रपाली नाही... कडकलक्ष्मी आहे. बोलाल तुम्ही आणि घरच्यांचा मार खाईन मी...” आईने काही बोलण्याच्या आधीच त्या मुलाने मित्रांना गप्पं केले आणि आईच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि तिच्या मैत्रिणींना मात्र माझ्या आईला चिडविण्यासाठी एक नवीन नाव मिळाले... कडकलक्ष्मी...
काळ कोणताही असो, किशोर वयात मुलींना मुलांच्या अशा शेरेबाजीला नेहमीच सामोरे जावे लागते. अशी शेरेबाजी सुरुवातीला अगदीच सौम्य आणि साधी वाटते. पण याला वेळीच आवर घातला नाही तर मात्र याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
माझी आई देखील काहीशी अशीच. तिला बोटीत बसायची भीती वाटायची, लिफ्टमध्ये बसायला ती भयंकर घाबरायची. इतकेच काय तर पाल आणि कुत्रे दिसले तरी त्यांच्यापासून १० फुट दूर जायची. पण सगळ्यात भयानक प्राणी... माणूस... याठिकाणी मात्र ती चांगलीच शूर होती. तिच्या मते आपण या प्राण्याला जितके जास्त घाबरतो, तितका हा प्राणी प्रबळ होतो. आणि या प्राण्याला वेळीच आवर घातला नाही तर याचे परिणाम वाईटही होऊ शकतात.
हा किस्सा आहे तिच्या शालेय जीवनातील. त्यावेळेस माझी आई मॅट्रिकला होती. त्यासाठीच तिने नाशिकच्या ‘गायकवाड क्लासेस’ मध्ये प्रवेश घेतला होता. तिला नवनवीन फॅशनची भारी हौस. त्याकाळी “आम्रपाली” हाराची चांगलीच क्रेझ होती. त्यामुळे ती नेहमी तो हार घालूनच क्लासला जायची. तिच्या क्लासमध्ये एक मुलगा होता. तो तिला त्या हारामुळे आम्रपाली म्हणू लागला. इथपर्यंत ठीक होते. आईने त्याकडे दुर्लक्ष केले. पण दिवसेंदिवस त्याची मजल वाढत गेली. आई जिथे दिसेल तिथे तो तिच्यावर शेरे मारू लागला. इतकेच काय पण आई आणि आजी बरोबर कुठे जात असतील तरी त्याची शेरेबाजी चालू झाली. आजी सोबत असल्यामुळे तिला शांत बसणे भाग होते. पण एक दिवस ते आजीच्या लक्षात आले.
“बेबी... तो मुलगा तुझ्या ओळखीचा आहे का?” आजीने विचारले.
“कोणता मुलगा?” खरे तर आईने आधीच त्या मुलाला पाहिले होते.
“तो बघ... त्या मुलांच्या घोळक्यात उभा आहे तो...” त्या मुलाकडे इशारा करत आजीने विचारले.
“नाही गं आई... मी नाही ओळखत त्याला.”
“मग तो तुझ्याकडे पाहून का आम्रपाली म्हणतोय?”
“ते मला काय माहित? आणि माझे नाव काय आम्रपाली आहे का?” आईने वेळ मारून नेली.
“बघ हं... आज मी सोबत असताना देखील तो मुलगा तुला चिडवतोय... उद्या त्याची मजल वाढत जाईल तेंव्हा मात्र हे प्रकरण जास्तच वाढलेले असेल.” आजीने आता तिला सावध केले.
“आई... तू नको उगाच काळजी करत बसू... चल... आपल्याला उशीर होतोय...” म्हणत तिने चालण्याचा वेग वाढवला. पण त्याला योग्य धडा शिकविण्याचे त्याच वेळेस ठरवले.
दुसऱ्या दिवशी जेंव्हा ती क्लासला आली त्यावेळेस ‘तो मुलगा कुठे दिसतोय’ हेच शोधत होती. पण त्या दिवशी तो मुलगा गैरहजर होता. तरीही तिने ही गोष्ट गायकवाड सरांच्या कानावर घालायचे ठरवले. क्लास सुटला तशी ती सरांसमोर हजर झाली.
“सर... माझी एक तक्रार आहे.”
“तक्रार? कशाबद्दल?” सरांनी विचारले.
“आपल्या क्लासला एक मुलगा आहे. तो मला कायम चिडवतो. इतके दिवस मी दुर्लक्ष केले. पण हळूहळू त्याची मजल वाढते आहे. काल माझी आई माझ्या सोबत असताना त्याने शेरेबाजी केली. आणि कित्येकदा क्लासमध्येही तो मला आम्रपाली म्हणून चिडवतो.” आईने एका दमात सगळे सांगून टाकले.
“अस्सं... थोडं आधी तर सांगायचं मला! आताच चांगली कानउघाडणी केली असती त्याची.” सर म्हणाले.
“आज तो आला नाहीये...”
“ठीक आहे... जेंव्हा येईल तेंव्हा मला दाखव तो मुलगा...”
“हो सर... नक्कीच...” इथवर संभाषण थांबले.
दोन तीन दिवसांनी तो मुलगा क्लासला आला. क्लास सुटला तशा मुली बाहेर पडू लागल्या. तेवढ्यात तिला मुलांच्या रांगेतून “आम्रपाली” हा शब्द ऐकू आला. तो इतक्या मोठ्याने होता की सरांनी देखील तो आवाज ऐकला. आईच्या मैत्रिणी बाहेर पडल्या पण आई मात्र दारातच उभी राहिली. सरही तिच्या जवळ येऊन उभे राहिले. सर्व मुली बाहेर पडल्यावर एकेक करून मुले बाहेर पडू लागले. क्लासला एकच दरवाजा असल्यामुळे त्या मुलाला देखील तेथूनच जाणे भाग होते. त्या मुलाने आईला दारात उभे राहिलेली पाहिल्यामुळे तो तोंड लपवत तेथून जाऊ लागला. पण आईचे लक्ष होतेच. तिने त्याच्याकडे बोट दाखवून सरांना सांगितले आणि सरांनी त्याला बाजूला बोलावले. सर्व मुले निघून गेल्यावर सरांनी सुरुवात केली.
“काय रे? नाव काय तुझे?”
त्याने नाव सांगितले.
“तू इथे मुलींना चिडविण्यासाठी येतो की पास होण्यासाठी?”
“काय झालं सर?” त्या मुलाने आपल्याला काहीच माहिती नाही अशा अविर्भावात विचारले आणि सरांनी कोणताही विचार न करता त्याच्या श्रीमुखात भडकवली.
“हे बघ... तू किंवा तुझ्या मित्रांपैकी कुणीही कोणत्याही मुलीला इथे किंवा बाहेरही चिडवले किंवा त्यांच्यावर काही शेरेबाजी केली तर सगळ्यांना हाताला धरून बाहेर काढेन. मला गरज नाही अशा विद्यार्थ्यांची. माझ्या विद्यार्थिनींच्या बाबतीत अशी कोणतीच गोष्ट मी खपवून घेणार नाही. समजलं?” सरांनी दम भरला आणि तो मुलगा काही न बोलता तेथून चालता झाला.
त्यानंतर जो पर्यंत क्लास चालू होता कुणीही आईला चिडविण्याची हिंमत केली नाही.
एक दिवस आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना पुन्हा “आम्रपाली” म्हणून आवाज आला. आईने पाहिले तेंव्हा तो मुलगा त्याच्या एका मित्राबरोबर गल्लीच्या कडेला उभा राहून हसत होता. क्लास संपल्यामुळे सरांचा धाकही संपला होता. आवाजाबरोबर आई थांबली तशा तिच्या मैत्रिणी तिला ‘चल इथून’ असे म्हणू लागल्या. पण आई तशीच वळली आणि त्या मुलाच्या समोर जाऊन उभी राहिली.
“तू मगच्या आळीत गायधनी वाड्यात राहतोस ना? तुझी आईही भद्रकाली मंदिरात दर्शनाला येत असते. जर तू सुधारला नाहीस तर या गोष्टी तुझ्या आईला जाऊन सांगेन. समजलास?” इतके बोलून त्याच्या प्रत्युत्तराची वाटही न पाहता ती मागे वळली.
दोन तीन दिवसांनी परत त्याच रस्त्याने माझी आई तिच्या मैत्रिणींबरोबर जात असताना तिला तो मुलगा २/३ मित्रांबरोबर गप्पा मारताना दिसला. तेवढ्यात त्याच्या एका मित्राने तिला पुन्हा “आम्रपाली” म्हणून चिडवले.
“ए भो... ती आम्रपाली नाही... कडकलक्ष्मी आहे. बोलाल तुम्ही आणि घरच्यांचा मार खाईन मी...” आईने काही बोलण्याच्या आधीच त्या मुलाने मित्रांना गप्पं केले आणि आईच्या चेहऱ्यावर हसू फुलले. आणि तिच्या मैत्रिणींना मात्र माझ्या आईला चिडविण्यासाठी एक नवीन नाव मिळाले... कडकलक्ष्मी...
काळ कोणताही असो, किशोर वयात मुलींना मुलांच्या अशा शेरेबाजीला नेहमीच सामोरे जावे लागते. अशी शेरेबाजी सुरुवातीला अगदीच सौम्य आणि साधी वाटते. पण याला वेळीच आवर घातला नाही तर मात्र याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.
No comments:
Post a Comment